Friday, November 10, 2023

राहिले ओठआतल्या...

 सुप्रभात,


कधी कधी शब्द ओठातून बाहेर यायला नाराज असतात , कधी परिपूर्णतेला शब्दांची गरज भासत नाही , कधी भावनावेग अति तीव्र होतात अन् वाणी मूक होते . 


कधी वा रा कांत यांचे एक गीत आठवते ...

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे 

राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे

भेट होती आपुली का ती खरी, कि स्वप्न माझे ?


कापले ते हात हाती बावरे डोळ्यात आसू

आग पाण्यातून पेटे जाळणारे गोड हासू

दोन थेंबांच्या क्षणांचे प्रीतीचे तकदीर माझे


गर्द हिर्वे पाचपाणी रक्तकमले कुंकुमाची

खेळताना बिंबलेली शुभ्र जोडीसार सांची

आठवे ? म्हटलेस ना तू ? हे हवेसे विश्व माझे


मी म्हणू कैसे, फुला रे, आज तू नाहीस येथे

वेळ दारी सावलीची रोज असुनी बार देते

लाख पुष्पे तोडिल्याविण ये भरोन पात्र माझे


मनाचा मनाशी होत असलेला संवाद उच्चारण्याची पात्रता वैखरीमधे असतेच असं नाही. पण कवींची प्रज्ञा तरल असते. त्यांच्या शब्दांमधे मनांत उमटलेले भाव प्रकट करण्याचे सामर्थ्य असते.

ज्याला डोळ्यांतले भाव वाचता येतात त्याला शब्दांची ही अडचण होते . हृदयाची स्पंदने अन् जाणिवांचे स्फुरण स्वयंपूर्ण असते. 

मन सदैव प्रेम आणि वात्सल्याच्या भावनांनी ओथंबलेले राहो. 

अनिरुद्ध कवीश्वर -

No comments: