Wednesday, November 6, 2019

माहेरच्या मातीला ही सुगंध असतो

माझ्या सर्व सख्ख्या आणि चुलत बहिणी म्हणजे अलकाच्या नणंदा आणि सर्व जावा अशा सगळ्या स्त्रीपार्टी ला ४ दिवस माहेरपणाला अलकानी  हैद्राबादला बोलावलं होतं. ११जणी घरी आल्या होत्या.
Sharing few lines...
सहज , मनातलं ....

आज किलबिलाट आपापल्या घरी निघाला त्यांना पाठवलेला मेसेज.

" तुम्ही सगळ्या जणी आल्या एकत्र त्याचाच खूप आनंद. आपण सर्वजण जींवनात खूप कष्ट घेतो
 आपापल्या परीनी कुटुंबाच्या प्रगतिसाठी. काही बरेवाईट प्रसंग प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. मुलांकडे लक्ष देता देता आपल्याला स्वतःच्या आवडी निवडींकडे पहायला वेळच मिळत नाही. मुलांच्या प्रगतिमधे , त्यांच्या सर्वांगीण विकासामधे आपलं समाधान असतं. मुलं आपापल्या पायावर समर्थपणे उभी राहिली की घेतलेल्या कष्टांचं सार्थक वाटतं. जींवनातल्या बर्या वाईट प्रसंगांमधून आपलं धैर्य आणि धीर दोन्हींची कसोटी लागते.
अधून मधून आपल्याला सुध्दा रिफ्रेश व्हावंसं वाटत असतं पण रोजच्या धबडग्यामधे आपण हे मिस् करत रहातो. यावेळी तुम्ही सर्वजण येऊन मनमोकळेपणानी रहावं यासाठीच बोलावलं होतं. शिल्पा सोडली तर आपण सर्वजण आयुष्याच्या सेकंड फेजमधे आहोत. आपण आपल्यातला उत्साह आपल्या स्वतःसाठी आणि मुलांसाठी पण जागृत ठेवायला हवा. परस्पर स्नेहभाव हाच खरा ठेवा आहे. तो आपण सर्वांनी जपला आहेच तो नव्या पीढीमधेही आपोआप ट्रान्सफर होतो आहे. ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.
झाडून सर्वजणी आलांत , खूप छान छान आठवणी तुम्ही मनांत घेऊन जावं अशी माझी आणि अलकाची दोघांचीही ईच्छा होती. I hope all of you enjoyed the stay.
माहेरच्या मातीला ही सुगंध असतो , नात्यांमधे गोडवा असतो तसा तो सासरी आलेल्या मुलींनाही वाटला पाहिजे म्हणून तुम्हा सर्वजणींना एकत्रच बोलावलं. खूष रहा , आनंद घेत रहा , आनंद वाटत रहा. "
अनिरुध्द कवीश्वर