Sunday, August 21, 2022

शिवसंकल्पमस्तु

आपण सदैव एक कंफर्ट झोन पहातो. पण तो ही आयुष्यातील वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत अलग असू शकतो. 

कोई अचानक घटना  दिल , दिमाग को झंझोडकर रखती है और हमारा जीवन की ओर देखने का नजरीया बदल देती है l 

कभी ऐसा लगता है बाकी सारे दरवाजे बंद हुए है और हम एक दिशा में चलने के लिये मजबूर हो गये हैl कालान्तर में हमारे विचार बदलते है और ऐसा प्रतीत होता है के जो हुआ वह सही था ।  

Everything depends upon how one cultivates his / her mind to cope  with the abrupt change in the situation , comfort zone . 

मला " ईशावास्य इदम् सर्वम् ... त्येन त्यक्तेन भुञ्जिथा "  यानी भुरळ घातली आहे. अत्यंत नेमक्या शब्दांमधून प्रवर्तनाची दिशा दाखवली आहे. त्यागाच्या भावनेनी उपभोग घ्यावा हे तत्व स्वतः मधे आमुलाग्र बदल घडवून आणण्यास मदत करते. एक प्रकारे स्वस्थचित्त करते. 

खूपदा घडलेल्या अथवा घडणाऱ्या घटनांचे योग्य विश्लेषण करणे आपल्याला जमत नाही. एक गोंधळ मनाला व्यापून टाकतो . आपण चाचपडत रहातो. हे चाचपडणे सुध्दा महत्वाचे आहे. गोंधळ सुध्दा शिक्षणाचा एक भाग आहे हे उमजू लागलं की खर्या अर्थाने व्यष्टी आणि समष्टी मधे संतुलन तयार होऊ लागतं. ही मनाची योगसाधना फार महत्वाची आहे. 

आपल्याला आलेले अनुभव आपण कोणत्या कसावर पारखतो ते आपली पुढील वैचारिक बैठक कशी असेल ते ठरवतं. यासाठी वर्षानुवर्षे ऋषि , मुनी सृष्टीच्या उत्पत्तीचे गूढ समजून घेण्याच्या मागे असतात. 

" तन्मे मन: शिवसंकल्पमस्तु " या संकल्पना प्रति जागरुक होणं म्हणजे ज्ञानमार्गावरील वाटचालीची सुरुवात. 🙏🙏



Thursday, August 18, 2022

जय जय रामकृष्णहरि

 मुलांची जबाबदारी वाढती असते . आईची जबाबदारी संपत नाही. 


आपल्या पिढीतील सर्वांना आधीची पिढी आणि नंतरची पिढी दोघांनाही धरुन ठेवायची सवय आहे. ते एका अर्थाने बरोबर असले तरी वैयक्तिक आयुष्यात आपली मूळ अध्यात्मिक प्रवृत्ती अधून मधून उचल खाते. 


मी आणि माझी कुलदेवता, माझे आराध्य दैवत , माझे गुरु यांच्यातील अनुबंध अंतर्मनात जागृत असतो. तसाच काळोखात खोल मनात  एक दुखरा कोपरा ठसठसत असतो. आपल्याशीच संवाद साधणारा ,  मध्यमेतला कातर स्वर . जखमेची ही सवय व्हावी तसा . 


आयुष्य म्हणजे वळणा वळणाची वाट . कधी कोणते वळण घेईल याची तिळमात्र कल्पना नसलेला मार्ग. सर्व भार महाराजांवर सोपवून भोगणे अथवा उपभोगणे एवढेच आपल्या हाती. 


 स्मशान वैराग्य , वैराग्य , ज्ञानोत्तर वैराग्य एकेक अवस्था नकळत येणारी . माऊलींनी भक्तिरसपूर्ण ज्ञान आणि रसिकता यांची सांगड घातली. जिवंतपणे मोक्षाचा अनुभव देणारे अमृतानुभव सांगून अलौकिक जाणिवांचा वर्षाव केला. 


नवरसात्मक भावभावनांच्या  पलीकडील दीर्घ शांततेतील अविरत उठणार्या आनंद कल्लोळाच्या  ऊर्मी शब्दांत गोठवल्या. बस्स!! आता  स्वयंभू , स्वसंवेद्य  आत्मरुपातील स्फुरण केवळ स्वानंदघन सोहळा.


जय जय रामकृष्ण हरि

जय जय रामकृष्ण हरि 


🙏🙏🌹


अनिरुद्ध कवीश्वर -