Sunday, December 8, 2019

गुरुकृपा

स्फुट ९

निसर्ग स्वभावतः च सर्व गोष्टी बैलन्स करत असतो. आपण कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करो की अनावधानानी आपल्याकडून घडो , निसर्ग आपले काम चोख करतो. सर्वात महत्वाची बाब  की घटना घडत रहातात . आपण आपल्याला आलेल्या अनुभवानुसार ठरवतो चांगली की वाईट. पण निसर्गाच्या दृष्टीनी ती फक्त एक सामान्य घटना असते. कर्मबंधनं आपण सोडू म्हंटल्यानी सुटत नाहीत की संपत नाहीत. इंद्रिये अतिशय प्रभावशाली असतात. इंद्रियगोचर अनुभव मनावर परिणाम घडवतात आणि मन सर्वश्रेष्ठ इंद्रिय आहे.  जीवनांत तीन तत्वे सत्व रज तम कार्य घडवून आणतात.  नवरस त्यात भावना ओततात. ज्या तत्वाचे प्रमाण जास्त तशा भावना आणि अनुभव प्रत्ययास येतात.  आपण ज्यावेळी साक्षित्वानी पहाण्यास , रहाण्यास सुरुवात करु त्यावेळी दृष्टी सम्यक होते. सदगुरुंना शरण गेल्यानी ,  देह आणि मनाशी संलग्न त्रिविध तापांचे नकळत निराकरण होत रहाते . निर्लेप वृत्ती रुजणे गुरुकृपेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून सदगुरु दत्तत्रेयाय , नवनाथाय शरणं मम।