आयुष्य म्हणता म्हणता उडून जाईल . अहंकार आणि स्वाभिमान यातली रेघ अतिशय पुसट आहे. भावनेच्या भरात आपण नकळत अहंकार तर जोपासत नाही ना ? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारुन पहावा. कोणी कोणाचे नसते असं जरी असलं तरी आपण स्वीकारलेली नाती तर खरीच असतात नं. स्वतःला मुक्त करण्याच्या नादात आपण कोषात तर जात नाही ना याचा विचार करणे गरजेचे आहे. आयुष्य क्षणभंगूर असलं तरी भावनांनी खुलवता येऊ शकतं फक्त डोळसपणे नात्यांकडे , व्यक्तिंकडे पहाता यायला हवं. 👍🏼
वास्तविक पहाता आपल्याला जे दृष्टोत्पत्तीस येतं ते आपलंच स्वरुप असतं. आपण सर्वांमधे स्वत:ला अवलोकित करत असतो. पुष्कळवेळा आपलेच गुणदोष जाणवतात.
आत्मचिंतनासाठी वेळेची मर्यादा नाही. कारण काळ विचारसापेक्ष आहे.
🙏🏼