Good morning and have a wonderful day ahead 👍
I don't know who said it... "Knowing when to leave is important. The party , the job , the relationship."
जीवनामध्ये मोह , काम , क्रोध या गोष्टी शेवटपर्यंत जाता जात नाहीत. मन विचलीत करतात.
त्यातही कामवासना फार प्रबळ किती ही नाही म्हटलं तरी बीजरुपानी शिल्लक असतेच. शरीराची साथ मिळो अथवा न मिळो धुगधुगी रहाते . भिन्नलिंगी व्यक्तींमधे आकर्षण ही निसर्गाची योजना आहे. मानसिक त्रास हा कामेच्छेचा आपण सहज स्वीकार न केल्याने होतो.
शुचितेच्या कल्पनांचं ओझं वाहणं जमत नाही आणि टाकणं त्याहून कठीण. त्याच अनुषंगाने क्रोध त्याबरोबर आलेली अगतिकता ही मनाला कुरतडत रहाते.
आपल्या मनाप्रमाणे गोष्टी न घडणं ह्याचा दोष आपण इतरांवर किंवा स्वतः वर लादतो. मनस्ताप करुन घेतो. आपण एकप्रकारे आपल्या अंतरात्म्याला दुर्ल़क्षीत करुन नको त्या विचारांना कवटाळून बसतो . ना घर का ना घाट का अशी आपली अवस्था आपणच करुन घेतो.
त्यापेक्षा कर्तेपणा स्वतः कडे न घेता जे घडतंय त्यात ईश्वरेच्छा मानून प्रसाद स्वरुप स्वीकारणं यात समाधान आहे.
अनिरुध्द कवीश्वर -
No comments:
Post a Comment