परतवारी...
पुढे चालणे म्हणजे मागे परतणे ...
ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्। ...
भगवत् गीता अध्याय १५ श्लोक क्रमांक
वरवर पहाता विक्षिप्त वाटणार्या संकल्पना सूज्ञ मनाला अध्यात्मिक विषयाबाबत कौतुहल निर्माण करणार्या आहेत.
अध्यात्मयोगामधे अनुप्रसव आणि प्रतिप्रसव अशा संकल्पना आहेत. अनुप्रसव म्हणजे सूक्ष्मातून स्थूलात येणे आणि प्रतिप्रसव म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे परतणे. एकप्रकारे मनाशी मनाद्वारे घडवून आणलेली परतवारी.
उर्ध्वगति अन् अध: गति अशा दोन गति आहेत. या फक्त दिशा दर्शवणार्या आहेत. उर्ध्वगति ही सृष्टीच्या मूल कारणा कडे नेणारी समजल्या गेली आहे . अध: गति ही त्यांच्या विपरीत म्हणजे मूल उर्जेतून प्रसरण पावत असलेल्या स्थूल प्रकृतिस संबोधित करते.
अध्यात्मातील प्रगति ही मोक्षप्राप्ती साठी उगमाकडे , मूलाकडे नेणारी असते. यासाठी योजिलेला शब्द म्हणजे प्रतिप्रसव प्रक्रिया. हा असा गूढार्थ , पुढे चालणे म्हणजे मागे परतणे यात अभिप्रेत आहे. तोच उर्ध्वमूलं मधे ही आहे.
शैव मतानुसार मूळ उर्जेतून शिवसंकल्पाच्या योगानी अनंत दिशांनी , अनंत शाखांमधून विभाजित होणारी शक्ति सृष्टीच्या माध्यमातून दृष्यमान होते . ही अनुप्रसव प्रक्रिया, हेच " अध: शाखम् ".
अश्व: चा एक अर्थ ज्याची गति तीव्र आहे असा आहे. गति असणारे ते सर्व अशाश्वत आणि त्या विरोधी श्व: म्हणजे स्थिर म्हणजे शाश्वत , नित्य.
तत्वतः पुढे चालणे किंवा उर्ध्वगति म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे , शाश्वताकडे चालणे आणि सूक्ष्मातून स्थूलाकडे चालणे म्हणजे अध:गति .
संत चोखामेळा म्हणतात ,
" ऊस डोंगा परि रस नाही डोंगा
का रे मुलालाही वरलिया रंगा "
वरवरच्या भ्रमित करणार्या शब्दार्थापेक्षा भावार्थ अन् गूढार्थाकडे लक्ष द्यावे . खरे अमृत दोहन ते आहे. 🙏🙏
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment