मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥
मन ही सभी मनुष्यों के बन्धन एवं मोक्ष की प्रमुख कारण है। विषयों में आसक्त मन बन्धन का और कामना-संकल्प से रहित मन ही मोक्ष (मुक्ति) का कारण कहा गया है ॥
मनाच्या वृत्ती सारख्या बहिर्गामी तर कधी अंतर्यामी कल्पनाविलासात रमलेल्या असतात. स्वप्न आणि जागृती यांचा लपंडाव सुरु असतो. तळ्यात मळ्यात असल्यासारखी परिस्थिती. मनाचा जोर इतका जबरदस्त असतो की त्यायोगे बुद्धी आपल्या कोणत्याही कृतींचे समर्थनार्थ प्रतिवाद करुन सत् पासून दूर जाते. मोहाचे क्षण बंधनात टाकत आहेत याची जाणीव सुध्दा होऊ देत नाही. अशा मोहाचा नाश म्हणजेच मोक्ष.
जसजसे तुम्ही अध्यात्मात खोल तन्मयता साधू जाता तेव्हा माया आपले मायाजाल अधिक गडद करते.
आपल्याला असं वाटू लागतं की आता आपल्याला सर्व ज्ञान प्राप्त झालंय . आपली कृतिशून्यता म्हणजे उच्च दर्जाची कार्यक्षमता अशी समजूत मन करुन द्यायला लागते. तो फार निसरडा क्षण असतो.
प्रकृति अनंत मार्गाने आपल्याला भुलवते. आपलं डोकं भिन करुन टाकते. आपण जे काही करतो ते योग्यच आहे किंबहूना तेच योग्य आहे असा मनाचा पक्का समज होतो अन् केव्हा आपला मार्ग अहंकाराच्या दिशेनी निघाला समजतच नाही.
अखंड सावधानता आणि अंतर्मुख होऊन पुन्हा पुन्हा आपल्या वृत्ती तपासून घ्याव्या लागतात.
नामस्मरणाने चित्ताची प्रसन्नता अनायासेच येऊ लागते. 🙏🙏🌹
अनिरुद्ध कवीश्वर -
No comments:
Post a Comment