आपल्याकडे काही ग्रंथकार बुध्दी म्हणजे मनाचाच विस्तार मानतात. मन हे एक विलक्षण रसायन आहे. शरीराचा ताबा घेऊन कोणत्या क्षणी ते कोणाला काय करायला भाग पाडेल याबद्दल काहीच ठोकताळे बांधता येत नाहीत.
आपल्याकडे एक मार्मिक म्हण आहे " वड्याचं तेल वांग्यावर काढणे " तात्कालिक कारणाने मनांत साचत गेलेल्या असंतोषाचा मानसिक संतूलनावर परिणाम घडत असतो.
आत्यंतिक क्रोधाच्या क्षणी मनुष्य एक तर दुसर्याच्या जीवावर उठतो किंवा स्वतः च्याच जीवावर उठतो. भगवान कृष्ण गीतेमध्ये ही अवस्था समजाऊन सांगताना म्हणतात " क्रोधात भवती संमोह , संमोहात बुध्दीनाश: "
त्याचवेळी पश्चात बुद्धी कार्यरत होते. मनुष्य अंतर्मुख होऊन विचार करु लागतो. भानावर येतो . इथे परिवर्तन सुरु होते. अत्यंत तीव्र भावनात्मक परिस्थितीतून बाहेर येण्याच्या वेळेस त्यांच्यासमोर ज्या गोष्टी येतात त्यांचा साधक बाधक विचार करण्याची बुध्दी त्याच्यातली ऊर्जा, अक्षम्य कृत्याच्या परिमार्जनार्थ कार्य करु इच्छिते. त्यातून काही उच्च दर्जाचे कार्य , साहित्य जन्माला येते. आपल्याकडे वाल्या कोळ्याचे वाल्मिकी ऋषि मधे परिवर्तन झाल्याचे उदाहरण आहेच.
एका कवितेच्या काही ओळींची आज आठवण झाली.
"तडित तडाडे उपजे काया
काळ्या कभिन्न मेघोदरी
तरी का वीज नसे का साजरी "
अनिरुद्ध कवीश्वर-
No comments:
Post a Comment