मला खूप वेळा प्रश्न पडतात आणि मी त्यावर मनन करीत रहातो. पण आपला विचार , आपली समजूत बरोबर आहे का ? हे जाणून घ्यायची मनोमन इच्छा असते.
काही काही वेळेला प्रश्न पडतात की शब्दांची उत्पत्ती अशीच होत नाही त्यामागे काही विशेष बाब असू शकते. अमुक एक नाम असण्यामधे सुध्दा काही अर्थ असावा .
वारकरी म्हणतात तसा "विटेवरी ठेला" हा मला भक्त पुंडलिकाच्या कथे संदर्भात सहज सोपा वाटतो.
आता ही विट कुठली ? सामान्यपणे ही माती भाजून केली वीट जी पुंडलीकाने आई-वडिलांच्या सेवेत असल्याकारणाने भगवंताला वाट पाहीस्तोवर उभं रहाण्या साठी म्हणून दिली. जी कथा सर्वमान्य आहे.
मला असं वाटतं की भगवंत असे सूचवू पहात आहेत की या प्रपंचातले सर्व दु:खभोग भोगून झाले , इंद्रियसुखे उपभोगून झाली दोन्ही सम समा झाले आता या सर्व गोष्टींचा वीट आला आहे अशी तुझी अवस्था होईल तेव्हा त्या विटेवरी मी सहजस्थितीत उभा ( ठेला ) आहे . ही सहजस्थिती संतांना प्राप्त झालेली असते.
ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ।।४८।।
अर्थ-ः ते संत दांभिक वैराग्याने भोगाला विटत नाहीत, आणि क्षणिक वैतागाने त्याग करण्यास उठत नाहीत तर, ते स्वतः आपल्या सहजस्थितीत सर्वकाळ राहतात. ||४८||
एकनाथी भागवत -
2 comments:
अनिल दादा तुमची पोस्ट उत्तम आहे..खूप सुंदर
धन्यवाद 🙏🏼
Post a Comment